केज सामाजिक वनीकरण(वनक्षेत्रपाल कार्यालय)केज यांना महापुरुषाच्या प्रतिमेची अलर्जी आहे का काय अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे?कारण ही तसेच आहे.चार पाच महापुरुषाचे प्रतिमा भिंती वर लावले आहेत,तर महात्मा गांधी चा प्रतिमा दिवळीत तर कांही फोटो गायब आहेत.कारण माहीत नाही पण सोईनुसार प्रतिमा लावल्याचे जाणवते.संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा तर नाहीच.एक वन अधिकारी,दोन वनपाल, एक चतुर्थश्रेणी असे पद असणारे फक्त कार्यालयात सेवक, साहेब दौर्यावर आहे सागण्या साठी ठेवलेला आहे.पण या इन मिन चार लोकांच्या हे लक्षात येत नाही की कार्यालयात महापुरुषाचा अपमान होतोय.आज ज्यांच्या मुळे मराठवाडा मुक्त झाला असे स्वामी रामानंद तीर्थ प्रतिमा सुद्धा नाही.काय म्हणाव अश्या अधिकाऱ्यांना.