केज शहरातून जाणारा रस्ता कधी पूर्ण होतो हे सांगणे ब्रम्हदेवाला सुद्धा सांगणे अशक्य आहे.गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून बनत असलेला रोड आता पर्यंत दहा पंधरा जिव व पन्नास एक अपंगत्व घेऊन सुद्धा अपुर्णच आहे.शहरात केजडी नदीच्या पुलावर जीवघेणे मोठ मोठे खड्डे पडले आहेत पण कंपनीला काहीच दिसत नाही,कोणी आवाज काढला की त्या वर मुरुम टाकुन देतात दुसर्याच दिवसांपासून रोड जशास तसा.केजडी नदीच्या पुला पासुन जयभवानी चौका पंर्यत 500 मिटर च काम किती दिवसात करतात हे कोणीच सांगु शकत नाही.पण आता या पुढे जर अपघात घडला तर पुर्ण दोष हा एचपीएम कंपनी चा असेल व त्यांच्या वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असा जनतेतून आवाज उठत आहे.