• Sun. Apr 19th, 2026

पंचायत समितीत अस्वच्छ तर ग्रामपंचायती कश्या राबवणार स्वच्छ भारत अभियान?

Bybaba maske

Jan 16, 2023

पंचायत समितीत अस्वच्छ तर ग्रामपंचायती कश्या राबवणार स्वच्छ भारत अभियान?

रोखठोक न्युज वार्ताहर 

जुन्या काही म्हणी अगदी समर्पक असतात जस गाढवाला कितीही चांगले सांभाळा उकिरड्यावरच लोळणार किंवा कुत्र्याला तुप सहन नाही होणार तसच कितीही चांगली इमारत बांधा मग पचापचा थुंकून घाणच करणार या लोकांना कधीच चांगले वागायची सवय लागणार नाही . पंचायत समितीची इमारत अतिशय सुंदर बांधली पण थूंकणारानी मात्र लालच केली .

पंचायत समितीची इमारत दर्शनी भागात अतिशय सुंदर बांधली या इमारतीचा लोकार्पण सोहळा अतिशय सुंदर पार पडला होता . शहराच्या मध्यवर्ती भागात न्यायालय , पंचायत समिती , तहसील व पोलिस ठाण्याच्या सुंदर इमारती झाल्या आहेत परंतु सरकारी कार्यालय म्हणजे आपल्याला काय त्याचे म्हणून कसही वागा आम्ही घाणच करणार मग काय सरकारी कार्यालयात होणाऱ्या घाणीत बसायची तयारी पण आम्ही सुधारणारच नाही . जस गाढव नावाच्या प्राण्याला कितीही चांगले खायला घाला , सुंदर जागेत ठेवा परंतु तो उकिरडा दिसला की त्यावर लोळणारच किंवा कुत्र्याला तुपाच चांगले खाऊ घातल की डनगाळी लागते अस म्हणतात तस कितीही चांगले बांधकाम करा रंगरंगोटी करा पण कोपरा दिसला अन रस्ता दिसला की पचकन थुंकणार मग कितीही घाण केली तरी मला काय करायच अस म्हणत वर तोंड करून चालायय .

यासाठी आवश्यकता आहे ती मानसिकता बदलायची.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!