केज तालुक्यातील मस्साजोग, चिंचोलीमाळी आणि नांदुरघाट तीन महसूल मंडळे दुष्काळग्रस्त यादीतून वगळलेमस्साजोग, चिंचोलीमाळी आणि नांदुरघाट यांच्यावर अन्याय का?
केज तालुक्यातील मस्साजोग, चिंचोलीमाळी आणि नांदुरघाट तीन महसूल मंडळे दुष्काळग्रस्त यादीतून वगळले
मस्साजोग, चिंचोलीमाळी आणि नांदुरघाट यांच्यावर अन्याय का?
रोखठोक न्युज वार्ताहर
यावर्षी जून पासून पावसाळ्याच्या अखेरपर्यंत पावसाने दांडी मारली त्यामुळे संपूर्ण केज तालुका दुष्काळाच्या छायेत आला आहे परंतु नुकतीच शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त महसूल मंडळांमध्ये केज तालुक्यातील तीन महसूल मंडळांना वगळल्यामुळे शेतकऱ्यांची तीव्र नाराजी सरकारवर झालेली पहावयास मिळत आहे.
दि. ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयाद्वारे या आधीच दुष्काळग्रस्त तालुक्यांचा यादीत काही तालुक्यांचा तालुक्यातील महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला होता तसेच पुन्हा काही आठ तालुक्यातील ५२ महसुली मंडळांचा दुष्काळ यादीत नव्याने समावेश करण्यात आला
असून यामध्ये केज तालुक्यातील केज, युसुफ वडगाव, हनुमंत पिंपरी, होळ, विडा, बनसारोळा या महसूल मंडळांचा समावेश केला असला तरी मसाजोग, चिंचोली माळी, नांदूर घाट हे तीन महसूल मंडळांना मात्र या दुष्काळग्रस्त मंडळाच्या यादीतून सरकारने वगळले आहे.
अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकरी अगोदरच मेटाकुटीला आलेला आहे शासनाने दुष्काळग्रस्त यादी जाहीर केली
परंतु काही महसूल मंडळावर मात्र शासनाने जाणून बुजून अन्याय केला की काय? असा प्रश्न आता येथील शेतकऱ्यांना भेडसावत आहे. कारण संपूर्ण केज तालुक्यात कुठेच समाधानकारक पाऊस नसताना तीन मंडळे यामधून वगळलीच कसे ? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. तलावातील पाणीही आता अगदी मृतावस्थेत गेल्यामुळे काही दिवसांवरच शासनाला आता गावोगावी टँकर सुरू करण्याची वेळ येऊ शक्ते, एवढा कठीण दुष्काळ यावर्षी येणार असल्याचे चित्र दिसत आहे. मग या तीन महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या शेतात अतिवृष्टी कशी काय होऊ शकते? की यामध्ये कोणी राजकारण करण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहे अशी चर्चा ही आता शेतकरी वर्गामध्ये होताना दिसत आहे.
पालकमंत्री यांच्याकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा
जून पासून अध्यापपर्यंत पावसाळा संपला तरी पाऊस आलाच नाही. त्यामुळे शेतकरी हैरान झाला असून हातात यावर्षीचे उत्पन्नही त्यांना काहीच मिळले नाही. त्यातच दुष्काळग्रस्तांच्या यादीतून मस्साजोग, चिंचोली माळी आणि नांदुर घाट या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे अपेक्षा आहेत की त्यांनी दुष्काळग्रस्तांमध्ये या महसूल मंडळाचा समावेश करून शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यावा अशी अपेक्षा त्यांच्याकडे शेतकऱ्यांची आहे.