गरिब मराठ्यांचा हक्क डावलणाऱ्या सरकारला धडा शिकवण्या साठी रोहन गलांडे पाटील लोकसभा निवडणूक लढवणार
रोखठोक न्युज वार्ताहर
मराठा आरक्षण मिळवण्यासाठी व सकल मराठा समाजाला आरक्षण मिळवण्या साठी मराठा समाज आग्रही आहे.पण सरकार ने दिलेले आरक्षण ना भेटते ना कोर्टात टिकते.गेले कित्येक दिवस शांततेत झालेले अंदोलन असो किंवा मोर्चे असो सरकार मराठा समाजाला फसवत आले आहे म्हणून राज्य सरकारने केलेल्या सगेसोयरेच्या अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करावे व अंमलबजावणी तात्काळ करावी या मागण्या महाराष्ट्र शासनाने मंजूर केल्या नाहीत म्हणून समाजसेवक रोहन गलांडे पाटील बीड लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.तरी राज्य सरकारने तात्काळ सगेसोयरेच्या अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करावे अन्यथा लोकसभा निवडणुकीत हजारो मराठा बांधव रिंगणात उतरणार आहेत त्यांच अनुषंगाने रोहन गलांडे पाटील यांनी सुध्दा बीड लोकसभा निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची भुमिका स्पष्ट केली आहे.येणाऱ्या काळात सरकारची वाट लावल्याशिवाय व सरकार ला गाडल्याशिवाय सोडणार नाही.आज पहायला गेलो तर जवळपास सात महिन्यांपासून मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील आपल्या जिवाच रान करत आहेत परंतु सरकार झोपेतच आहेत म्हणून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत हजारो मराठा बांधव लोकसभा निवडणूक लढवणार मग सरकारला कळेल मराठा खडा तो सरकार से बडा या शब्दाचा अर्थ असे रोहन गलांडे यांनी म्हटले आहे.तरी येणाऱ्या निवडणुकीत प्रत्येक गावातुन तीन चार उमेदवार जाहीर करण्यात यावे लोकसभा निवडणूकीसाठी रिंगणात उतरावे व राज्य सरकारने केलेल्या सगेसोयरेच्या कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत सगळ्यानी मराठा बांधवांनी ऐक जुटीने लढायचे असे रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले आहे.
