गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज तालुक्यातील येवता येथील शेतकऱ्यांने आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी की दिलीप विष्णूपंत जोगदंड हे आज पहाटे उठून दररोजच्या नित्य नेमाने शेतात जाऊन जनावरांना चारा पाणी करण्यासाठी गेले होते.परंतु त्यांनी आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे हि वार्ता गावात कळताच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून व पोलीस प्रशासनाला पाचारण करून त्यांना सोडून शवविच्छेदन करण्यासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करुन शवविच्छेदन क्रिया करून त्यांच्या वर गावातच अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. परंतू आत्महत्या केल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही सदरील तपास केज पोलीस हे करत आहेत.घटनास्थळी विडा बिटचे बिट जमादार वाघमारे यांनी पंचनामा केला आहे.
