शेतकरी तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू
रोखठोक न्युज वार्ताहर
केज तालुक्यातील माळेवाडी येथील सागर बाळासाहेब चंदनशिव वय वर्ष २६ शेतकरी तरुणाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. सविस्तर घटना अशी की सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान सागर चंदनशिव घराशेजारील शेतामध्ये आपल्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी विहिरीकडे गेले होते. त्यादरम्यान त्यांचा विहिरीमध्ये पाय घसरून दुर्दैवी मृत्यू झाला. विहिरीच्या आजूबाजूला कोणीही नव्हते त्यांचे जनावरे त्यांच्या घरी वापस गेल्यानंतर जनावरे दिसू लागली परंतु सागर चंदनशिव दिसत नसल्याचे कुटुंबाला आढळून आले त्यांनी शोधाशोध केली. ते दिसून येत नव्हते काही वेळाने त्यांच्या लक्षात आले की जनावरांना पाणी पाजण्यासाठी सागर चंदनशिव हे विहिरीकडे गेले होते. त्यानंतर कुटुंबाने विहिरीकडे धाव घेतली त्यामध्ये सागर चंदनशिव हे विहिरीमध्ये पडून मृत अवस्थेत निदर्शनास आले. त्यानंतर दुरुक्षेत्र नांदुर घाट पोलीस चौकीचे बीट आमदार उमेश आघाव व पोलीस नाईक बाळराजे सोनवणे यांना दूरध्वनीवरून गावकऱ्यांनी फोन केला घटनास्थळी पंचनामा करून पोस्टमार्टम साठी नांदुर घाट ग्रामीण रुग्णालय येथे बॉडी हलवण्यात आली या घटनेमुळे माळेवाडी व परिसरामध्ये पाडव्याच्या सणा दिवशीच दुर्दैवी घटना घडल्या बद्दल शोककळा पसरली आहे. सागर चंदनशिव यांचे लग्न काही महिन्यांपूर्वी झाले होते. घरातील कर्ता व्यक्ती निघून गेल्याने चंदनशिव कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळलेला आहे.
