मराठाआरक्षण व शांतता जनजागृती रॅली ११ जुलै !
अखंड बीड जिल्ह्यातील मराठा बांधवांनी उपस्थित रहावे – रोहन गलांडे पाटील
रोखठोक न्युज वार्ताहर
विश्वासघातकी सरकार सगेसोयरे कायदाची अंमलबजावणी करत नाही व आपल्या मराठा आरक्षणावर कुठलाही ठोस निर्णय घेत नाही.आपले मराठ्यांचे दैवत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली दि.11 जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजता मार्ग – डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक आयोजित केली आहे तरी अखंड मराठा समाज, बीड जिल्ह्यातील मराठा बांधवांनी मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली मध्ये उपस्थित रहावे असे आवाहन समाज बांधव रोहन गलांडे पाटील यांनी केले आहे. आपल्या लेकरांच्या न्याय हक्कासाठी दि. ११ जुलै २०२४ रोजी ठिक सकाळी ११ वा. मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली ठेवली आहे तरी बीड जिल्ह्यातील सकल मराठा समाज बांधवांनी आपल्या प्रत्येक गावातुन कमीत कमी दोन गाड्या जिप,पीकप, स्कारपीओ आशा चार चाकी दोन चाकी गाड्या तरी घेऊन निर्णय महाबैठकीस उपस्थित रहावे व आपली काळजी घेण्यासाठी पाऊसाळ्याचे दिवस असल्याने पाऊसा पासुन बचाव करण्यासाठी रेन कोट इतर साहित्य पाऊसा पासुन बचाव करण्यासाठी सोयीनुसार आपली सोय आपल्या गाडी सोबत करायची आहे व लाखोंच्या संख्येने निर्णय महाबैठकीस लाखोंच्या संख्येने मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली उपस्थित रहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते रोहन गलांडे पाटील यांनी केली आहे . तरी बीड जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील आमरण उपोषणकर्ते, साखळी उपोषणकर्ते, मराठा सेवक, स्वयंसेवक, सभा आयोजक-नियोजक, डॉक्टर, वकील, अभ्यासक, शेतकरी, कष्टकरी आणि सर्व मराठा बांधव,मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली मध्ये लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते रोहन गलांडे यांनी केले आहे.
