• Sun. Sep 20th, 2026

वाल्मीक कराड यांनी आपला जामीन अर्ज कोर्टातून वापस घेतला!

Bybaba maske

Jan 23, 2025

वाल्मीक कराड यांनी आपला जामीन अर्ज कोर्टातून वापस घेतला!

रोखठोक न्युज वार्ताहर 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणी  प्रकरणाला आज नाट्यमय वळण मिळाले. संशयित आरोपी वाल्मीक कराड  याच्या वकीलाने सादर केलेला जामीन अर्ज आज मागे घेतला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट आणि मकोका अंतर्गत न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित आरोपी वाल्मीक कराड याच्यावर आवादा एनर्जी या पवन चक्की प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांकडून खंडणी मागितल्याचा आरोप आहे.

खंडणी प्रकरणीदेखील त्याला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. खंडणी प्रकरणी आज (दि.२३) त्याच्या जामीन अर्जावर केज न्यायालयात सुनावणी होणार होती. आज सकाळी ११.३० वाजता सरकारी वकील अॅड. जितेंद्र शिंदे, आरोपींचे वकील अॅड. अशोक कवडे आणि सीआयडीचे तपास अधिकारी डीवायएसपी अनि गुजर हे सर्वजण केज येथील ‘ क’ स्तर दिवाणी न्यायालया मुख्यन्यायाधीश एस. व्ही. पावसकर यांच्या न्यायालयात हजर झाले. त्यानंतर जामीन अर्जावर सुनावणी सुरू होण्यापूर्वीच संशयित आरोपीचे वकील अॅड. अशोक कवडे यांनी

न्यायालयासमोर जामीन अर्ज माघारी घेण्यासंबंधी विनंती अर्ज सादर केला.

त्यामुळे वाल्मीक कराड याला खंडणी प्रकरणी जामीन मिळतो की नाही? अशी जी चर्चा सुरू होती. ती आता थांबली आहे.

‘तारीख पे तारीख’ला ब्रेक

वाल्मीक कराड याच्या जामीन अर्जावर १८ जानेवारी रोजी सुनावणी होणार होती. त्यानंतर त्याच्या वकीलाची तब्बेत बरी नसल्याने पुढील सुनावणी २० जानेवारी रोजी ठेवण्यात आली होती. पण २० जानेवारी रोजीदेखील आरोपींच्या वकीलाने पुढील तारखेच् केली. त्यामुळे जामीन अर्जावर २३ जानेवारी रोजी सुनावणी होणार होती. पण आता वाल्मीक कराड याचा जामीनाचा अर्जच मागे घेण्यात आला आहे.

baba maske

Related Post

विलास घुले हत्या प्रकरणाला नवा ट्विस्ट; CIDच्या 200 पानी चार्जशीटमध्ये खासदार सोनवणेंच्या मुलाचे नाव नाही! केज न्यायालयात दहा आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल; 15 सप्टेंबरला CIDची कारवाई
फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!