मुर्दाड जिल्हाप्रशासना विरोधात 302 चाच गुन्हा दाखल होईला पाहीजे.
बीड जिल्हधिकारी कार्यालयासमोर पारधी समाजातील उपोषण कर्तयाच्या संदर्भात
रोखठोक वार्ताहर
काल दिनांक.४ डिसेंबर वार रविवार रोजी सकाळी ८ दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घरकुलाच्या न्याय मागण्यासाठी गेल्या २५ वर्षापासून संघर्ष करणा-या पारधी समाजातील आप्पाराव पवार यांचा जिल्हाप्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे बळी गेला असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या माणसाचा मृत्यु म्हणजेच जिल्हाप्रशासनाने लोकशाहीचा केलेला खुनच आआहे.हा लोकशाहीचा नव्हे तर प्रत्येक आंदोलन करत्याची दखल प्रशासन घेत च नाही.अगोदर फक्त निवेदन दिले तर हलणरे प्रशासन, कुणाचा मृत्यु जरी झाला तरी संवेदनशील नाही.कोणी आमरण उपोषण करत असेल तर तीन दिवस तर त्याची दखल सुद्धा घेतली जात नाही.आता प्रशासन स्वतःच डोक लावत हा स्टंट करण्या साठी बसलायका,खरच बसलाय…त्या वर मग पुढची ढिम्म कारवाई चालु होते.हा अलिखित नियम प्रशासनाने स्वतः लावून घेतला आहे.त्या मुळे मुळ मुद्या कडे लक्ष रहात नाही.व न्याय भेटत नाही थातूरमातूर आश्वासन देऊन उपोषण सोडल जात पण ते काम कधीच होत नाही.मग तो उपोषण करता त्याचा नाद तरी सोडतो किंवा खुपच गरजेच असेल तर आत्महत्या करतो.तरी त्याला न्याय भेटत नाहीच!!!
घरासाठी पूर्वीपासूनच संघर्ष
पारधी समाजातील लोकांचा अगोदर ४० वर्षापासून रहात असलेल्या जागेसाठी संघर्ष त्यानंतर घरकुल मिळण्यासाठी संघर्ष त्यानंतर घरकुलाचे हफ्ते मिळवण्यासाठी व त्यानंतर अर्धवट बांधकाम पुर्ण करण्यासाठीचा संघर्ष .
पारधी समाजासाठीचे निर्णय धनदांडग्यांसाठी का नाही???जिल्हाप्रशासनाची बोटचेपेपणाची भुमिका; कागदी घोडे नाचवून अडवणुक
पारधी समाजातील लोकांना शासनाचा जीआर दाखवणारे जिल्हाप्रशासन ईतर राजकीय पुढारी,भुमाफियांवर मात्र मेहेरबान दिसून येते. घरकुल मागणा-या पारधी समाजातील अडानी लोकांना मात्र कागदीघोडे नाचवून अडवणुक करतंय.