केज शहरातील तीन किराणामाल व्यापाऱ्यां मुळे सामाजिक तेढ वाढण्याची शक्यता:वहातूक पोलीसांनी योग्य वेळी कारवाईची अपेक्षा.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज शहराती मधोमध असणारा संत भगवान बाबा चौकात मोठ्या प्रमाणात नागरिक, विद्यार्थीयांची गर्दी असते या चौकातुन केज शहरातील सगळ्या शैक्षणिक संस्था,खाजगी शिकवणी,व कानडी रोड वर असणारे व्यावसायिक दुकाने व संत भगवान बाबा चौकातील दवाखाने.मेडिकल दुकाने,कापड व्यावसायिक यांच्या मुळे हा चौक नेहमी वरदळ असणारा चौक आहे.तरीपण या मुख्य रस्त्यावर, तीन मोठे किराणामाल व भुसार मालाचे व्यापारी यांचे दुकाने आहेत व तेथेच त्यांचे गोडाऊन आहेत त्यामुळे येथे किराणामाल घेऊन येणार मोठ मोठे ट्रक श कंटेनर येथे आडवे तिडवे लावलेले असतात.अश्यातच गेल्या आठवड्यात संत भगवान बाबा चौकाला एक कंटेनर धडकला व खुप मोठा जमाव पोलीस ठाण्यात जमा झाला काही अशीं त्या वर पोलीसांनी व त्या समाजाच्या सामंजस्याने ते प्रकरण निवळे पण जत आता काही तसेच घडलेतर? तसेच विद्यार्थी यांचा अपघात झाला तर यास जिम्मेदार कोण? असा प्रश्न नागरिकात चर्चेला जात आहे.