केज मध्ये होणाऱ्या निकृष्ट कामाचा जिमेद्दार कोण? नाहरकत प्रमाणपत्रात संदिग्धता टक्केवारी घेणारे शुक्राचार्य समोर आणा! यश कन्स्ट्रक्शनच नाव मोठे आहे बदनाम होऊ नका!
केज मध्ये होणाऱ्या निकृष्ट कामाचा जिमेद्दार कोण? नाहरकत प्रमाणपत्रात संदिग्धता
टक्केवारी घेणारे शुक्राचार्य समोर आणा!
यश कन्स्ट्रक्शनच नाव मोठे आहे बदनाम होऊ नका!
रोखठोक न्युज वार्ताहर
केज शहरातील नगरोत्थान योजनेंतर्गत 76 कोटीच्या कामात अनियमिता झाली आहे.नालीच काम एकदम निकृष्ट पध्दतीने केले आहे.आता नाली बांधकाम ढासळत आहे.निकृष्ट काम बाबतीत आता सत्य समोर येऊ लागले आहे.काम मिळवण्या पासुन ते नाहरकत प्रमाणपत्र मिळवण्या साठी मोठी उलाढाल झाल्याच बोलल जात आहे.शहरातील मंजूर झालेल्या रस्त्यावर कुठेच आतिक्रमन नसून ती सगळी जागा नगरपंचायत ची आहे व या जागेवर कुठलेही काम प्रस्तावित नाहीत असे नाहरकत प्रमाणपत्र गुत्तेदाराला दिले खरे पण हे सगळी नगरपंचायत केलेली दिशाभूल आहे.नगरपंचायत ना नगररचनाकाराचा सल्ला घेतला ना कोणती विचारणा केली घाई गडबडीत नाहरकत प्रमाणपत्र देऊन टाकल.काय ऐवढी गडबड असेल नगरपंचायतला?किती तरी वर्षा नंतर आपल्या कार्यकाळात 76 कोटीचा निधी आला त्याचा सुयोग्य नियोजन करून उत्कृष्ट काम करायचे सोडून सगळ्या कामाची वाट लावल्याचे दिसुन येत आहे.वार्ड क्रमांक आठ मध्ये 2021-22 च्या मार्च मध्ये रस्त्याच्या कामा साठी 20 लाखाचा निधी मंजूर असताना नगरपंचायतने तो दाबून ठेवला व या 76 कोटीच्या कामातच ते काम दाखवला व पुन्हा नाहरकत देताना येथे कुठलेही काम प्रस्तावित नाहीत असे खोटे नाहरकत प्रमाणपत्र दिली.तसेच स्टेट बँक ऑफ हैदराबाद पासुन पोस्ट ऑफिस पंर्यत रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण असताना कोठे ही अतिक्रमण नाही असे दुसरे खोटे नाहरकत प्रमाणपत्र दिले.त्यामुळे या ठिकाणी रस्ता लहान झाल्याने नाली बांधकाम व रस्ता लहान होत आहे.याची जबाबदारी ही नगरपंचायत व यश कन्स्ट्रक्शनची सुद्धा आहे कारण रस्ता करताना हे कन्स्ट्रक्शनच्या लक्षात आले पाहिजे होत.पण त्यांनी सुद्धा चुकीचे काम करत राहीले यात केजच्या सौंदर्यात भर न पडता करूप केज दिसणार आहे.कारण या नंतर कानडी रोड ते सार्वजनिक स्मशानभूमी पंर्यत होणाऱ्या कामात सर्व रस्त्यावर अतिक्रमण आहे मग काम कसे होणार?याचा सारासार विचार करून ते टक्केवारी घेऊन नाहरकत प्रमाणपत्र देणारे जनतेच्या समोर आले पाहीजे अशी मागनी आता जनतेतून होत आहे.तसेच केज शहरातील वार्ड क्रमांक आठ,उमरीरोड, मंगळवार पेठ ते पोस्ट ऑफिस येथील बांधकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमित्ता दिसून आली. कित्येक ठिकाणी अतिक्रमण वाचवण्यासाठी नाल्यांना वळणे देण्यात आले. त्यामुळे त्याच ठिकाणी कामाचा दर्जा ढासळला. एवढेच नव्हे तर नाल्यांचे बांधकाम ज्या प्रमाणात पक्के व्हायला हवे होते तसे न झाल्याने काही ठिकाणी नाल्या ढासळल्या सुद्धा. तसेच रस्त्याची ३३ फुटाची रुंदी ही कित्येक ठिकाणी कमी झाली आणि या सर्व प्रश्नांची चर्चा सदरील प्रभागातील नागरिक तक्रारीच्या स्वरूपात करू लागले. मात्र सदर रस्त्याचे काम होणे हे तर आवश्यक आहे. त्याचबरोबर गुणवत्ता पूर्ण कामही होणे गरजेचे आहे. सदरील काम सुरू होण्याच्या अगोदर पासूनच काही अडथळे येत गेले. यामध्ये काहींनी अतिक्रमण वाचवण्याचे प्रयत्न केले तर काहींनी वेगळीच काहीतरी मागणी केल्याची चर्चा सुरू झाली. यामध्ये ज्या प्रभागातील रहिवाशांच्या आयुष्यभराचा प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये किंवा त्या कामांमध्ये नेमके अडथळे निर्माण कोण करते ? आणि कोण कशाची मागणी करते हेही समोर आले पाहिजे. कारण काम कुठलेही जरी असले तरी शंभर टक्के नियम जरी नाही लागू झाले तरी मात्र मागच्या अनेक वर्षांची हेळसांड पाहता काम दर्जेदार व्हावे अशी इच्छा नागरिकांचीच नव्हे तर काम करून घेणाऱ्यांची, काम करणाऱ्यांची आणि जे कामाचे श्रेय घेणार आहेत त्यांची असायला पाहिजे. मात्र काम सुरू होण्याच्या अगोदरच जर यामध्ये कुणी कुणाचे हितसंबंध जपत असेल आणि कुणी कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तसेच काही वेगळी “अर्थपूर्ण मागणी करण्याचा प्रयत्न करत असेल तर असे झारितले शुक्राचार्य जनतेच्या समोर नक्कीच आले पाहिजे. आणि कोण नेमकं दबावाला बळी पडत आहे ? आणि त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा दबाव येतोय हे त्यांनी जरी समोर येऊन स्पष्ट नाही केले तरी मात्र एक ना एक दिवस अडथळे आणणारे समोर येणारच आहेत.
दरम्यान, सामान्य नागरिक विनाकारण तक्रारी करत नाहीत. त्यांना जे समोर दिसते ते मांडत असतात. त्यामुळे नाली बांधकामामध्ये जी कांही अनियमितता झाली आहे त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आणखीही वेळ गेलेली नाही. आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाकड्या तिकड्या झालेल्या नाल्या सरळ करण्याचे मनावर घेतल्याचे बोलल्या जात आहे. तसे झाले तर ठीक अन्यथा सर्वसामान्य नागरिक जी अनियमितता दिसेल ती समोर आणणारच……!