आमोल मुळे यांनी 200 नारळाचे झांडाचे वाटप करून केला वाढदिवस साजरा.

रोखठोक न्युज वार्ताहर
केज तालुक्यातील उमरी-सांवतवाडी ग्रुप ग्रामपंचायत चे सरपंच सुमन विश्वम्बर मुळे यांचे चिरंजीव अमोल मुळे यांनी अनावश्यक खर्च टाळून गावामध्ये 200 नारळाचे झाडे वाटले व त्यातील स्वतः गावात रोपण केले.पर्यावरणाच्या दृष्टीने झाडाची कत्तल जास्त व वृक्ष रोपन कमी होत आहे.त्यामुळेच पर्यावरणाचा रास होत आहे.हे कुठे तरी थांबले पाहिजे असा विचार करून याची सुरुवात आपल्याच गावा पासुन करायचे असे मनोमन निश्चित करून स्वतःच्या वाढदिवसानिमित्त याची सुरुवात केली असे संरपच पुत्र अमोल मुळे यांनी रोखठोक शी बोलताना सांगीतले.त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचा गावातील नागरिकात कौतुकाचा विषय झाला असुन.गावा समोर एक नविन आदर्श ठेवल्याचे बोलले जात आहेत.200 झाडा तुन काही स्वता लावले तर बाकी गावकऱ्यांना ते देऊन त्यांना सुद्धा लावण्या साठी प्रोत्साहीत केल.
